
महाराष्ट्रासह देशात राज्यसभेच्या ३७ जागासाठी निवडणूक जाहीर झाली आहे त्यातच महाराष्ट्रातील ७ जागांसाठी रस्सीखेच सुरू असतानाच नेहमीच्या शैलीत रामदास आठवले यांनी मला राज्यसभा मिळणारच आहे पण मला लोकसभा लढवायची आहे असे अतरंगी राजकीय वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत एक दलित चेहरा म्हणून केंद्राच्या पहिल्याच सपथविधीत नंबर लागलेले मोदी मंत्रिमंडळातील ते मंत्री आहेत त्याना सामाजिक न्याय मंत्रीपदी कायम राहण्यासाठी त्याना लोकसभा किवा राज्यसभेवर निवडून जाने आवश्यक आहे सध्यातरी लोकसभेवर निवडून जाणे शक्य नाही आनी भाजपात अनेक पदाधिकारी यांच्यात राज्यसभेसाठी वर्णी लागावी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते दिल्लीतील महाशक्तीपर्यंत प्रयत्न सुरू आहेत खुद्द शरद पवार महाविकास आघाडीतून राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी धडपडत असताना सामाजिक न्यायमंत्री यांचे वक्तव्य म्हणजे आठवलेची अतरंगी शैली अधोरेखित करणारीच म्हणावी लागेल









